महाराष्ट्रातील राजकारणात बसपच्या हत्तीच्या आगमनाच्या निमित्ताने राजकारणाचे सिंहावलोकन करण्याचा चौकस यांचा अप्रतिम लेख.
राण्यांच्या बरोबर काँग्रेसवासी झालेल्या आणि पोटनिवडणुकीत परत निवडून आलेल्या आमदारांना काहीतरी द्यावे यास्तव राण्यांच्या दिल्ली वार्या सुरू झाल्या आहेत. काँग्रेसी संस्कृतीकडे पाहता आता राण्यांना अशा वार्या करतच काळ कंठावा लागेल असे दिसते. त्यांची ताकद सिंधुदुर्ग ओलांडून रत्नागिरीतही पोचताना दिसत नाही. आणि सिंधुदुर्गात श्रीधर नाईक आणि सत्यविजय भिसे खून प्रकरणात त्यांनी दोन्ही काँग्रेसच्या लोकांना दुखावून ठेवले असल्याने तिकडूनही गणित अवघड होऊन बसले आहे. कर्नल सुधीर सावंतांनी बार काढायला सुरुवात केलीच आहे, मात्र ते वायबार निघण्याचीच शक्यता जास्त वाटते. पण एकुणात राण्यांची गाडी घाटाला लागलेली दिसते.










Comments
1 comment. Leave your comment »
MAHI
Dec 13th, 2007 at 5:28 am | #
i like ur marathi