चौकस यांनी घेतलेला शिवसेनेच्या वाटचालीचा आढावा.
राज्य जन्माला येऊन सहा वर्षे झाली होती. ६२ सालच्या चीन युद्धामुळे अनेक वस्तूंची टंचाई निर्माण झाली होती वा करण्यात आली होती. मुंबईचे आयुष्य तुलनात्मक दृष्ट्या पाहता तेवढेच धकाधकीचे होते. त्यात मराठी माणसाच्या मनात आपल्याला कायम डावलले जातेय अशी भावना निर्माण करायला इतर भाषिक कसोशीने हातभार लावीत होते. तमिळ ब्राह्मण त्यात आघाडीवर होते. त्यांना पन्नाशीच्या दशकापासूनच द्रमुक चळवळीने तामिळनाडूबाहेर हाकलले होते. ‘ब्राह्मण तेवढा ठेचावा’ असे त्या काळातील सर्व द्रविडी पक्षांचे मुख्य धोरण होते. कर्नाटकी ब्राह्मण असलेल्या जयललिता राजकारणात यायला बराच वेळ होता.









Comments
Comments are closed on this post.